जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल; ५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला मतमोजणी

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

मुंबई प्रतिनिधी

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला असून राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी या निवडणुकांची अधिकृत घोषणा केली. या घोषणेनुसार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. ग्रामीण भागाच्या सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांकडे नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

निवडणूक वेळापत्रक

नामनिर्देशन पत्र स्वीकारणे: १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६

नामनिर्देशन पत्रांची छाननी: २२ जानेवारी २०२६

उमेदवारी माघार घेण्याची अंतिम मुदत: २७ जानेवारी २०२६

अंतिम उमेदवार यादी जाहीर व निवडणूक चिन्ह वाटप:२७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेतीन नंतर

मतदान: ५ फेब्रुवारी २०२६

मतमोजणी: ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.या निवडणुकांमुळे राज्यातील ग्रामीण राजकारणात मोठी चुरस पाहायला मिळणार असून प्रचार, उमेदवारांच्या घोषणा आणि राजकीय हालचालींना येत्या काही दिवसांत वेग येणार आहे.

error: Content is protected !!