मठाचीवाडीमध्ये राजकीय समीकरणे बदलली; ग्रामपंचायतीसह भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण : तालुक्यातील मठाचीवाडी येथे नुकत्याच झालेल्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच, सदस्य आणि अनेक ग्रामस्थांनी एकत्रितपणे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त केला. या सामूहिक निर्णयामुळे मठाचीवाडीमध्ये भाजपची ताकद अधिक भक्कम झाल्याचे स्पष्ट दिसत आहे….
मलठण प्रभाग क्रमांक ५ मध्ये विकासकामांचा धडाका; कोट्यवधींच्या कामांना उत्साहात प्रारंभ
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण : शहरातील मलठण येथील प्रभाग क्रमांक ५ मध्ये नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी विविध विकासकामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. रस्ते काँक्रीटीकरण, तसेच लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासारख्या अत्यावश्यक कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होऊन नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल…
“गोविंद चषक” क्रिकेट स्पर्धेचे तिसरे पर्व; राज्यभरातील संघांचा सहभाग
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी :-फलटण एज्युकेशन सोसायटी आणि क्रिकेट अकॅडमी ऑफ चॅम्पियन्स यांच्या संयुक्त विद्यमाने “गोविंद चषक” अंतर्गत १२ वर्षांखालील (U-12) व १४ वर्षांखालील (U-14) गटांसाठी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ३ मे ते २० मे २०२६ या कालावधीत श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल, शिंगणापूर रोड, फलटण येथे…
सावकारीचा तगादा व आर्थिक छळाला कंटाळून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची आत्महत्या; सहा जणांवर गुन्हा
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रवींद्र लालासो खोपडे (वय ४२) यांनी सावकारीचा तगादा, आर्थिक फसवणूक तसेच फायनान्स व बँक अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त…
भारताची जनगणना २०२७ : स्वयं-जनगणना व डिजिटल पद्धतीचा पहिल्यांदाच अवलंब
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी- संपूर्ण देशात राबविण्यात येणाऱ्या भारताची जनगणना २०२७ प्रक्रियेत यंदा पहिल्यांदाच स्वयं-जनगणना (Self Enumeration) आणि डिजिटल जनगणना ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी फलटण तालुक्यात प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली असून नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदाची जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या…
फलटणच्या डी.एड. चौकातील ‘ट्रँगल’ इमारतीवर वाद; परवानगी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण : फलटण शहरातील मध्यवर्ती डी.एड. चौक परिसरात उभारण्यात आलेल्या ‘ट्रँगल’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीबाबत मोठा वाद निर्माण झाला असून या बांधकामाच्या कायदेशीरतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित इमारत पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा आरोप होत असताना, फलटण नगरपरिषदेकडून या बांधकामास परवानगी कशी देण्यात आली, तसेच या इमारतीला पूर्णत्व दाखला (Completion Certificate)…
वाचनाने माणसाच्या मनाची मशागत होते – ताराचंद्र आवळे
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण :- फलटण तालुक्यातील गोखळी येथे शाहिद भगतसिंग प्रतिष्ठान संचलित स्व. राजेंद्र तात्या भागवत सार्वजनिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त “१३५ ग्रंथ भेट” कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माणदेशी साहित्यिक व रयत सेवक ताराचंद्र आवळे उपस्थित होते.यावेळी…
फलटणमध्ये २२ एप्रिल रोजी ‘हिंदू संमेलन’चे आयोजन
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण : सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरात ‘हिंदू संमेलन’चे आयोजन करण्यात आले असून, हिंदुत्वाचा विचार आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. हे संमेलन बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर येथे पार पडणार आहे.या कार्यक्रमात धर्मरक्षण, हिंदू संस्कृतीचे…
रविवार पेठ तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण व कलशारोहण सोहळा
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण – शहरातील रविवार पेठ येथील तालीम गणपती मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानिमित्त लोकार्पण व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, दि. २२ ते २४ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांचे सविस्तर वेळापत्रक दि. २२ एप्रिल :सकाळी ११ ते दुपारी २ – श्रींच्या मूर्ती व कलश…
आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी कागदपत्र पडताळणीला मुदतवाढ; आता ३० एप्रिलपर्यंत संधी
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणीसाठीची मुदत आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी २० एप्रिल २०२६ रोजी…


