नीरा नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक, प्रशासनाचे दुर्लक्ष

खंडाळा प्रतिनिधी – वीर धरण क्षेत्रामध्ये असणारा नीरा नदीवरील अरुंद पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. याबाबत स्थानिक नागरिक व वीर ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार पुलाची उंची वाढवून संरक्षक कठडे बसविण्याची मागणी केलेली आहे. मात्र संबंधित विभागाकडून याकडे कायम दुर्लक्षच केले जात आहे.

या पुलाच्या एका बाजूला पुरंदर तालुक्याची हद्द आहे तर दुसऱ्या बाजूला खंडाळा तालुक्याची हद्द आहे.वीर धरणाच्या खालच्या बाजूला नीरा नदीपात्रात 1958 साली हा पूल बांधण्यात आला होता या फुलाला 65 वर्ष पूर्ण झाली असून वीर धरणाचे काम सुरू असताना हा पूल धरणाच्या कामासाठी बांधण्यात आला होता. धरणाच्या लगत असलेला रस्ता व पूल धरण प्रशासनाच्या मालकी हक्कात येत असून सार्वजनिक बांधकाम विभाग याच पुलाचा वापर सार्वजनिक वाहतुकीसाठी करत असल्याचे धरण प्रशासनाकडून घेतलेल्या माहितीवरून लक्षात आले आहे. आपुल अतिशय अरुंद असून एकावेळी एकच वाहन या पुलावरून कसेबसे जाते व या फुलाला संरक्षक कठडे नाहीत सावधगिरी विषयी कोणत्याही सूचना या पुलाच्या दोन्ही बाजूला लिहिलेल्या नाहीत त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणे जोखीमीचे ठरते.

वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यास हा फोन वाहतुकीसाठी काही काळ बंद असतो व पुलावरून धरणाचे पाणी वाहत असते. याच पुलावरून अनेक वाहने नदीपात्रात कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत. नदीमध्ये धरणाचे वेगाने पाणी वाहत असते तेव्हा पुलावर उभे राहिल्यास हादरे जाणवतात. पाण्यामुळे वाहन चालकाचे डोळे फिरत असल्याचे ग्रामस्थांकडून कळते. वीर व पंचक्रोशीतील लोकांसाठी लोणंद बाजारपेठ जवळ असल्याने याच पुलावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, तसेच खंडाळा तालुक्यातून सासवड व पुण्याकडे जाणारा हा मध्यवर्ती रस्ता असल्याने कायम वाहतूक असते, त्यामुळेच संबंधित पंचक्रोशीतील नागरिकांकडून या पूलाची डागडुजी करावी अथवा नवीन पूल बांधण्यात यावा अशी चर्चा आहे.

error: Content is protected !!