फलटण प्रतिनिधी: संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यातील दोन वारकरी तुषार रामेश्वर बावनकुळे वय २२ रा खलासना नागपूर व मधुकरराव तुकारामजी शेंडे वय ५५ रा मेडिकल चौक नागपूर यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून उपचारासाठी नातेपुते ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते या वेळी त्यांना मृत घोषित करण्यात आले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बरड जवळ टोल नाका नजीक ही घटना घडली असून वारकऱ्यांना तंबू उभा करताना शॉक लागून या ठिकाणी हा अपघात झाला आहे असे स्थानिक नागरिकांनी सांगितले फलटण ग्रामीण पोलीस व बरड पोलीस स्टेशन यांचेकडून अधिक माहिती मिळाली नाही. नक्की अपघात कसा झाला याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाकडून दिली गेली नाही.