संत निरंकारी मिशनद्वारे रक्तदान शिबिरात ९९ बॅग रक्त संकलन

l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l दि. २८ एप्रिल २०२५ l महेश जाधव

प्रेम आणि बंधुभावना जागविणारा ‘मानव एकता दिवस’, संत निरंकारी मिशनद्वारे दरवर्षी २४ एप्रिल रोजी बाबा गुरबचन सिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ श्रद्धा आणि भक्तिभावनेने परिपूर्ण वातावरणात आयोजित केला जातो. हा दिवस केवळ पुण्यस्मरण करण्याचा प्रसंग नसून मानवता, सौहार्द आणि एकत्वाच्याभावनांचा एक आत्मिक संगम आहे. कराड विमातळ येथे संत निरंकारी सतसंग भवनात आयोजित रक्तदान शिबिरात ९९ दात्यांनी रक्तदान केले.

या शिबिराचे उद्घाटन सातारा झोन ३४ A चे झोनल ईनचार्ज नंदकुमार झांबरे जी, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कराडचे मुखी दिलीप कोरडे (आबा) यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी कराडसह ढेबेवाडी,नांदगाव,रेठरे बु,उंब्रज ब्ँच मधुन मोठा जनसमुदाय उपस्थीत होता. रक्त संकलन साठी जिल्हाउप रुग्नालय कराड उपस्थीत होते. विशेष उपस्थीती माजी विधान परिषदेचे आमदार मा.आनंदराव पाटील (नाना) यांनी रक्तदान शिबीरास सदीच्छ भेट देउन निरंकारी मिशनच्या कार्याबद्दल भरभरुन कौतुक केले.

मानव एकता दिवसाच्या या प्रसंगी मिशनकडून देशभर रक्तदानाच्या एका प्रेरक श्रृंखलेचा शुभारंभ होतो. जी निःस्वार्थ सेवाभावनेच्या सामूहिक जागृतीचे स्वरूप बनून संपूर्ण वर्षभर समाजामध्ये प्रवाहित होत राहते. त्याचबरोबर सत्संग कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेम, शांती आणि समरसतेचा प्रकाशदेखील जनसामान्यांपर्यत पोहचविला जातो.

error: Content is protected !!