पावसाने साचलेल्या पाण्याचा आणि भुयारी गटर योजना यांचा कोणताही संबंध नाही : श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर

फलटण प्रतिनिधी:- फलटण शहरात मुसळधार पावसाने साचलेल्या पाण्याचा आणि भुयारी गटर योजना यांचा कोणताही संबंध नाही विरोधी पक्षांनी याबाबत भुयारी गटर योजना चुकीची असल्याचे भासवून नागरिकांच्या गैरसमज करू नये असे मत श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

भुयारी गटर योजना नक्की काय आहे त्याचे उद्दिष्ट काय आहे ते विरोधी पक्षांनी पहावे, भुयारी गटर योजना ही घरगुती सांडपाणी व मलनिस्सारण करण्यासाठी आहे आजुन ती योजना सुरू झाली नसून ही योजना पावसाळ्यातील पाणी वहन करणारी योजना नाही. रिंगरोड येथील गटार कोणी बांधले रस्त्यापेक्षा गटर वरती बाधले आहे ज्या ठेकेदाराने हे गटार बांधली आहे तो ठेकेदार खासदार गटात आहे विनाकारण पडलेल्या मुसळधार पावसाचा दोष राजे गटाला देऊ नये.

पावसाचे पाणी आणि भुयारी गटर योजना यांचा काहीही संबंध नाही. पावसाचे पाणी भुयारी गिटार मधून सोडले जाणार नाही. फलटण शहरांमध्ये अनेक ठिकाणी सखल भाग असल्याने पावसाळ्यात पाणी साचत होते याबाबत यापूर्वी नगर परिषद माध्यमातून अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने पाईपलाईन कामे हातात घेऊन नागरिकांच्या अडचणी सोडवल्या आहेत. विनाकारण नागरिकांच्या मध्ये गैरसमज करून देण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षाकडून सुरू आहेत.

मागील दोन दिवसात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला असल्याने काही सखल भागात पाणी साचत आहे. सोशल मीडियावर माहिती नसलेल्या योजनेवर चुकीचे बोलून गैरसमज पसरवण्यापेक्षा अभ्यास करून बोलावे असे मत श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी मांडले.

error: Content is protected !!