नागरिकांनी अत्यावश्यक कामापुरतेच घराबाहेर पडावे: आमदार सचिन पाटील

फलटण प्रतिनिधी:- फलटण तालुक्यात मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस चालू असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामापुरतेच घराबाहेर पडावे तसेच बाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केली आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने सातारा जिल्ह्यात हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी केला आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तसेच तालुक्यात कुठेही आपत्ती सदृश्य परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनास अथवा आमच्या जनसंपर्क कार्यालयास अवगत करावे.

आज दुपारी पर्यंत माहिती घेतली असता अदर्की खुर्द व भिलकटी या दोन गावातील नागरिकांच्या घराच्या भिंती कोसळ्या आहेत सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. याबाबत फलटण प्रशासनास तत्काळ पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत.तसेच फलटण प्रशासन व आरोग्य विभाग तसेच कृषी विभागाने आवश्यक ती काळजी घ्यावी व आपत्ती सदृश परिस्थिती आढळल्यास तेथे त्वरित आवश्यक ती मदत करावी. असे आवाहन आमदार सचिन पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!