कोमल कांबळेंवर हल्ला करणारे हल्लेखोर अटक करा:जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सपकाळ

l महाराष्ट्र माझा l वाई प्रतिनिधी l दि.१ मे २०२५ l

कोमल कांबळेंवर यांच्यावर करण्यात आलेला हल्ला हा हल्ला गणेश भोसले आणि बापु भोसले यांनीच घडवून आणला असून बापु भोसलेचा अटकपूर्व जामीन नामंजूर करावा तसेच कोमल कांबळे यांच्या जीवाला धोका असल्याने वाई पोलीसांनी कोमलला सुरक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सातारा-आजाद समाज पक्ष यांनी केलेल्या मागणीनुसार व पोलीस विभागास दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे, दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी वाई पोलीस ठाण्यात माधवी गणेश भोसले आणि बापु रामचंद्र भोसले यांच्यावर कोमल कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ केली तसेच मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिली यामुळे ॲट्रोसिटी गुन्हा तसेच इतर गुन्हे दाखल झाले.यानंतर भोसले कुटुंबानी वाई न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्जही केला आणि जामीन मंजूरही झाला.यानंतर दोनच दिवसात २२ एप्रिल २०२५ रोजी गणेश भोसले आणि बापु भोसले हे नंदनवन सोसायटीत गेले आणि कोमल कांबळेला जिवे मारण्याची धमकी दोघांनी दिली.लगेच दुसर्‍याच दिवशी २३ एप्रिल रोजी कोमल कांबळेंवर धारधार शस्त्रांने हल्ला करण्यात आला हा हल्ला गणेश भोसले आणि बापु भोसले यांनीच घडवून आणला आहे त्यामुळे बापु भोसलेचा अटकपूर्व जामीन नामंजूर करावा तसेच गंभीर हल्ला केल्याने हल्लेखोर पकडुन अटक करावे तसेच कोमल कांबळे यांच्या जीवाला धोका असल्याने वाई पोलीसांनी कोमलला सुरक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सातारा विश्रामगृह येथे पञकार परिषदेत जखमी कोमल कांबळे यांनी वाई पोलीसांकडून होणारा अन्याय व्यक्त केला आणी पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहेत असे मत व्यक्त केले.जिल्हाध्यक्ष सातारा-आजाद समाज पक्ष भाऊसाहेब सपकाळ यांनीही हल्लेखोरांना अटकपूर्व करा असे आवाहन केले. जिल्हाधिकारी सातारा तसेच पोलीस अधीक्षक सातारा यांनाही निवेदन देण्यात आले हे निवेदन देताना जगदीश कांबळे,विजय सपकाळ, नंदकिशोर कांबळे,अल्केश सोनवणे,संतोष कांबळे तसेच इतर उपस्थित होते.

error: Content is protected !!