वाई-सुरूर मार्गावर वृक्षतोड झाल्यास आत्मदहन : स्वप्नील गायकवाड

वाई :- वाई-सुरूर रोडवर रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या रस्त्यावर पर्यटकांना तसेच प्रवास करणाऱ्यांना सुखद सावली देणारी अनेक शेकडो वर्षे जुनी झाडे तोडली जाणार असल्याने येथील पर्यावरणप्रेमींमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

‘आरपीआय’च्यावतीने बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सातारा यांना निवेदन देऊन वृक्षतोड झाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा ‘रिपाइं ‘ने दिला आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने वाई-सुरूर रस्त्याच्या दोन्ही कडेला पुण्यावरून येताना किंवा वाईवरून पुण्याकडे जाताना दोन्ही बाजूला वड, आंबा, चिंचेसह इतर प्रकारची शंभर- दोनशे वर्षांपासून त्या ठिकाणी उभी असणारी मोठी झाडे आहेत.

रस्ता रुंदीकरण हे तालुक्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे यात शंका नाही. मात्र, हे करताना आमची नैसर्गिक संपत्ती यावर आपण काय निर्णय घेणार आहात, हे आम्हाला समजणे गरजेचे आहे. निवेदनाला गांभीर्याने न घेतल्यास येणाऱ्या काळात मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

error: Content is protected !!