शुद्धलेखनाच्या नावाखाली ७/१२ उताऱ्यांमध्ये फेरफार; महसूल विभागातील ‘सर्वात मोठा’ घोटाळा उघड – दीड लाख शेतकरी बाधित
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क मुंबई / पुणे — राज्याच्या महसूल विभागात अभूतपूर्व असा मोठा घोटाळा उघडकीस आला असून, शुद्धलेखन दुरुस्तीच्या नावाखाली थेट जमिनीच्या मालकी हक्कांमध्येच फेरफार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीरता इतकी मोठी आहे की, स्वतः महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत याबाबत कबुली दिली असून, “महसूल खात्याच्या इतिहासातील हा…

