३० जूनपूर्वी कर्जमाफी : दिलासा की निवडणूक जुमला ?
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क विक्रम विठ्ठल चोरमले “३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी” — ही घोषणा ऐकायला जितकी गोड, तितकीच ती शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण करणारी आहे. कारण राज्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून घोषणांचा अनुभव घेत आहे, परिणामांचा नाही. त्यामुळे ही कर्जमाफी खरोखर दिलासा देणारी आहे की निवडणुकीआधीची राजकीय पतंगबाजी, हा प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात घोळतो…

