फलटण तालुक्यात गूढ आवाजाची मालिका कायम

फलटण प्रतिनिधी: फलटण तालुक्यात गूढ आवाजाची मालिका कायम असून, मंगळवारी (दि.१) सकाळी ९.०० वाजता मोठा गूढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. ब्लास्टिंग सारख्या आवाजाप्रमाणेच हा गूढ आवाज असल्याचे सांगण्यात येत होते. या आवाजाबद्दल नागरिकांमध्ये संभ्रमावस्था कायम असून, तालुका प्रशासनाकडून याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण शहरा लगतच्या…

Read More

ढेबेवाडी बाजारपेठेतील खड्डे मुरूम टाकून अखेर मुजवले,”महाराष्ट्र माझा” बातमीचा इम्पॅक्ट

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- ढेबेवाडी बाजारपेठेतील रस्त्यांची खड्ड्यामुळे अक्षरश चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने खड्ड्यात पाणी साचून तळ्याचे स्वरूप निर्माण झाले होते याबाबत “महाराष्ट्र माझा” बातमी प्रसिद्ध होताच ग्रामपंचायत कडून खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून खड्डे मुजवण्यात आले. मागील आठवड्यात मंगळवार रोजी ढेबेवाडीचा बाजार असल्याने व्यापारी व ग्राहकांना येजा करताना मोठी कसरत करावी लागत होती….

Read More

नवीन वीज जोडणी करीता महावितरण कर्मचारी त्रास देत असल्याने वीज ग्राहक हैराण

फलटण प्रतिनिधी :- फलटण महावितरणच्या विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व उपविभागात नवीन वीज मीटर जोडणीचे पैसे भरूनही जोडणी करीता लाईनमन व जनमित्र त्रास देत असल्याने वीज ग्राहक हैराण झाले आहेत. फलटण विभागीय कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या फलटण शहर, फलटण ग्रामीण, लोणंद, खंडाळा या उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भागातील वीज ग्राहक पुरते वैतागले असून महावितरण कर्मचारी यांच्याकडून…

Read More

संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा फलटण येथे विजेच्या धक्क्याने मृत्यू

फलटण प्रतिनिधी: संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यातील दोन वारकरी तुषार रामेश्वर बावनकुळे वय २२ रा खलासना नागपूर व मधुकरराव तुकारामजी शेंडे वय ५५ रा मेडिकल चौक नागपूर यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून उपचारासाठी नातेपुते ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते या वेळी त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बरड जवळ टोल नाका नजीक…

Read More

“डराडो” या एनजीओतर्फे वारकऱ्यांना मोफत चहा,पाणी आणि बिस्कीट वाटप

फलटण प्रतिनिधी:- दिनांक 28 जून 2025 रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी फलटण मध्ये दाखल झाली. तेव्हा “डसऱ्याक असोसिएशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन” यांचेमार्फत वारकऱ्यांना माऊलींना मोफत चहा, पाणी व बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले. हा आयोजित कार्यक्रम महाराष्ट्रातील काही दानशूर व्यक्तींच्या देणग्यांमुळे यशस्वी झाला त्या सर्वच देणगीदारांचे तसेच ज्या ज्या व्यक्तींमुळे हा कार्यक्रम उत्कृष्ट…

Read More

ढेबेवाडी बाजारपेठेतील रस्त्याच्या मधोमधच पाण्याचे तळे, बाजारासाठी आलेल्या नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे हाल

l ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) l ढेबेवाडी बाजारपेठेतील रस्त्यांची खड्ड्यामुळे अक्षरश चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने खड्ड्यात पाणी साचून तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. आज मंगळवार २४ रोजी ढेबेवाडीचा बाजार असल्याने व्यापारी व नागरिकांना येजा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने हे खड्डे भरण्याची तसदी न घेतल्याने गावातील नागरिकांसह वाहनचालकांमधून तीव्र संताप…

Read More

श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याचा १२ लाख टन ऊस गाळप करण्याचा निर्धार

। फलटण प्रतिनिधी । आगामी २०२५-२६ हंगामात श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याने १२ लाख टन ऊस गाळप करण्याचा निर्धार केला असून, त्या अनुषंगाने तोडणी आणि वाहतूक यंत्रणेची करार प्रक्रिया निष्पन्न झाली आहे. कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी श्री दत्त इंडियाच्या ६ व्या मिल रोलर पूजन समारंभात याबाबत माहिती दिली. गेल्या पाच हंगामांत शेतकऱ्यांना वेळेवर आणि…

Read More

कोळकीसाठी ९० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

फलटण प्रतिनिधी :- कोळकी गावाच्या वाढत्या लोकसंख्येच्या पाणीपुरवठ्याच्या तुटवडीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास घोषणा केली आहे. सध्याच्या १५ हजार लोकसंख्येच्या नळ पाणीपुरवठा योजनेला वाढवून, अंदाजे ९० कोटी रुपयांच्या नवीन योजनेला तातडीने मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी दिली. कोळकी हे फलटण शहराजवळील गाव असून, येथे लोकसंख्या सतत वाढत…

Read More

फलटण शहर पोलिस ठाण्यात व उपजिल्हा रुग्णालयात आरोपींची बडदास्त

फलटण प्रतिनिधी : फलटण शहर पोलिस व उपजिल्हा रुग्णालय हे फिर्यादी पेक्षा आरोपींची उठाठेव करण्यात मग्न असल्याने तालुक्यात हुकूमशाही वाढली असून कायद्याचा धाक कमी झाला आहे. गरीब नागरिकांना न्यायासाठी प्रचंड झगडावे लागत असून फलटण शहर पोलिस व उपजिल्हा रुग्णालय यांच्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने तालुक्यात प्रचंड गुंडागर्दी वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण…

Read More

नीरा नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक, प्रशासनाचे दुर्लक्ष

खंडाळा प्रतिनिधी – वीर धरण क्षेत्रामध्ये असणारा नीरा नदीवरील अरुंद पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. याबाबत स्थानिक नागरिक व वीर ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार पुलाची उंची वाढवून संरक्षक कठडे बसविण्याची मागणी केलेली आहे. मात्र संबंधित विभागाकडून याकडे कायम दुर्लक्षच केले जात आहे. या पुलाच्या एका बाजूला पुरंदर तालुक्याची हद्द आहे तर दुसऱ्या बाजूला खंडाळा तालुक्याची हद्द…

Read More
error: Content is protected !!