गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा होणे काळाची गरज : सदाभाऊ खोत

फलटण प्रतिनिधी:  दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने संकरित जर्सी होस्टन गायींचे गोठे वाचवायचे असतील तर गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा होणे काळाची गरज आहे फलटण तहसिलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, गोवंश हत्याबंदी कायद्यात जर्सी होस्टन गाई, जर्सी बैल, म्हशी, रेडे हे वगळण्यात यावे सरकारने शेतकर्‍यांचा गोठा वाचवावा व गो-पालकाला जगवावे. कायद्यात सुधारणा होणे गरजेचे होते या कायद्याच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोठ्यामधील गाभन न राहणाऱ्या गाई, म्हशी, वयस्कर गाई विविध कारणामुळे दूध न देणाऱ्या गाई अशा गाईंचे संगोपन करणं तसेच ज्या जर्सी होस्टन गाई व्यायल्यानंतर ज्यांना खोंड होत आहेत अशा खोडांचा गंभीर प्रश्न दूध धंद्यातील दराच्या चढ-उतारामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यापुढे निर्माण झाला आहे यामुळे जर्सी गाईंच्या गोठ्यांचे मालक दूध व्यवसायाच्या अनुषंगाने आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथून सुरू झालेला हा मोर्च्या छत्रपती शिवाजी महाराज चौक , डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक , महात्मा फुले चौक व शेवटी प्रांत कार्यालय येथे पोहचला या वेळी फलटण तालुक्यातून हजारो शेतकरी बहुसंख्येने उवस्थित होते गोवंश हत्याबंदी कायद्यात बदल करा शेतकरी वाचवा आशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.          

    यावेळी रयत क्रांती संघटनचे जिल्हाध्यक्ष अमोल खराडे, जेष्ठ प्रवक्ते खंडू करचे, तालुकाध्यक्ष अभिमन्यू ठोपरे, खडेराव सरक, शेखर खरात, हेमंत सुतार, प्रसाद अनपट, सुधीर शिरसागर, दादा गोफणे, चेतन चव्हाण, संतोष जावळकर, राजेश खराडे, निलेश सोनवलकर, दीपक सस्ते, संतोष शेडगे, सागर डोईफोडे, साई शिदे, पांडुरंग गायकवाड, योगेश संकपाळ, विशाल संकपाळ, तुकाराम गावडे, अमर गावडे, सागर सोनवलकर, अलंकार भोईटे, भरत नांगरे, प्रवीण कदम, बाळू शिंदे, रामदास सोनवलकर, नवनाथ कुंडलकर, त्रिंबकराव डोंबाळे, दीपक डोंबाळे, अक्षय झणझणे, दिलीप शिपकुले, बाळू शिपकुले, सतिश शिपकुले, संदीप ढोपरे यांसह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

error: Content is protected !!