
ग्राम विकासाचा आधुनिक पॅटर्न दाखविणारा अवलिया… चंद्रकांत दळवी
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील ‘निढळ’ हे छोटेसे खेडेगाव. येथील लोकांचे जगण्याचे एकमेव साधन म्हणजे शेती. तीही पावसावर अवलंबुन असणारी. त्यामुळे ज्वारी, बाजरीसारख्या जिरायती पिकांतून जे उत्पन्न मिळेल तेच येथील लोकांच्या जगण्याचे साधन. दुष्काळ हा पाचवीलाच पुजलेला. अशा अवस्थेत शेतीवर संपूर्ण कुटुंब चालविणे अवघड असल्यामुळे कुटुंबातील एक तरी माणूस कामानिमित्त पुणे-मुंबई सारखी शहरे जवळ करत…