निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार : राज्य निवडणूक आयोग
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क मुंबई | प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रशिक्षण पूर्ण करणे अत्यावश्यक असून, प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व कायद्यानुसार पार पडण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आवश्यक असल्याचे आयोगाने नमूद केले आहे….

