खळे नगरीत धुमधुमला हरी नामाचा गजर, प्राथमिक शाळेमध्ये आषाढीवारीचे आयोजन
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :-पंढरपूरची ‘वारी’ हा समता, बंधुता, एकतेचा संदेश देणारा सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. यात कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असण्यापूर्वी माणूस असणे आवश्यक बंधनकारक आहे. किंबहुना मूलभूत गरजच आहे.संत साहित्यातून नुसता ‘माणूस’च नाही तर ‘चांगला माणूस’ घडण्याची प्रक्रिया होत असते. जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन ‘माणूस’ म्हणून सर्वांना एकत्र करीत समतेचे कार्य…

